आम्ही म्हणालो ठिक आहे…

पहिले सांगितले भारतात कोरोना नाही येणार,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
मग सांगितले गर्मी मुळे कोरोना मरेल,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
नंतर सांगितले सोशल डिस्टंन्सिंग ठेवा,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
मग सांगितले कर्फ्यू लावू, साखळी तोडू,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
मग, सांगितले १८ दिवसात महाभारत जिंकले होते, आपण २१ दिवसात जिंकू,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
मग सांगितले उत्साह येण्यासाठी टाळी थाळी वाजवा,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
मग सांगितले देशाच्या एकतेसाठी दिवा आणि मेणबत्ती पेटवा,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
जेंव्हा यांच्याने काहीच झाले नाही तेंव्हा हे म्हणाले आत्मनिर्भर बनो,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
कमाई बंद आहे, खर्च खुप आहे, पॅकेज जाहिर केले, मिळाले काहीच नाही,
आम्ही म्हणालो ठिक आहे…
त्यानंतर आजपर्यंत गायब आहेत
आम्ही म्हणालो चला ठिक आहे…
आता सांगा आम्ही विरोध कुठे केला? कोणती गोष्ट मानली नाही? …
जर प्रश्न विचारले तर देशद्रोही घोषित…..
खरेतर,लोकशाहीत, सामान्य जनतेने जगण्याचा हक्कच गमावला आहे….!.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा