मोठी बातमी: यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात… निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्याची दिलासादायक घोषणा


मुंबई, २१ जुलै २०२२: मागील दोन वर्षामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी, गणेशोत्सव असे मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या उत्सवांवर अनेक निर्बद लागू करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने यावरर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहीती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज अतिशय महत्वाची बैटक झाली.

कायदा सुव्यवस्था राखून सण साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी सर्व मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडपांच्या परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहीजेत.

गणेश मंडळांना नोंदणीसाठी शुक्ल आकारण्यात येणार नाही. कोरोनामुळे उंचीवर मर्यादा घालण्यात आली होती. मात्र ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे‌. अशी
घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा