केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मनमाडमधील खचलेल्या रेल्वे ब्रिजची केली पाहणी, उड्डाण पुल आणि बायपाससाठी गडकरींची घेणार भेट

नाशिक १ डिसेंबर २०२३ : नाशिकच्या मनमाडमध्ये कठडा खचलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करीत खचलेला कठडा तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.

रेल्वेच्या ब्रिजचा कठडा खचल्याने शहर दोन भागात विभागले गेले तर पुणे – इंदूर महामार्गाची वाहतुकही वळविण्यात आल्याने नागरिक व वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.या पुलाच्या इतर भागाचे स्ट्रक्चलर ऑडीट करून त्याची दुरुस्तीचे काम हाती घेण्याबरोबर नवीन उड्डाण पुल व बायपास रोडबाबत केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे आश्वासन यावेळी डॉ. भारती पवार यांनी दिले.

न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा