कोरोना पाठ सोडेना, केंद्र सरकारच्या नेत्यांचे अजब दावे संपेना…..!

नवी दिल्ली, दि. २७ जुलै २०२०: कोरोना काळात भाजपाच्या नेत्यांना काय झाले आहे. याचा थांगपत्ता लागत नाही. दर दिवशी त्यांची व्यक्तव्ये हि लोकांच्या काळजी पोटी नसून विनोद बुद्धीने होत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकिकडे अजून भाभीजी पापडचं प्रकरण निवळत नाही तोच भाजपच्या भोपाळच्या खासदार नेत्या प्रज्ञा ठाकूर यांनी एक अजब व्यक्तव्य केले आहे. ज्यामधे ५ वेळा हानुमान चालीसा म्हंटले की कोरोना होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

जेंव्हा सर्व हिंदू एकत्र येऊन हानुमान चालीसा म्हणतील तेंव्हा नक्कीच आपण कोरोना मुक्त होऊ, कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत सर्वांनी जर हनुमान चालीसा ५ वेळा म्हणाली तर लोकांना उत्तम आरोग्य लाभेल आणि कोरोना संपेल असा अजब दावा या प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे.

कोरोना मुळे संपुर्ण जनता हि त्रस्त आहे, तर केंद्र सरकार व राज्य सरकार देखील या बाबतीत कमी पडताना दिसत आहे. पण, अशा परिस्थितीत लोकांना धीर द्यायचे सोडून सरकार मधीलच दिग्गज नेते असे विधान करत या समस्त जनतेला धीर देत आहेत की त्यांचं हसू करत आहेत हाच प्रश्न उपस्थितीत होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा