मुंबई, ४ सप्टेंबर २०२०: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, शिवसेने पाठोपाठ मनसेने ही कंगना राणौतला धमकीवजा इशारा दिला आहे.
‘ मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा,’ अशा शब्दात कंगना राणौतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे. या आधी संजय राऊत यांनी ट्विट करत असं म्हटलं होत की, मी धमकी देत नाही तर ॲक्शन घेतो. यावर कांगणाने असं ट्विट केलं आहे.
कांगनानं केलेल्या या आव्हानाला उत्तर देत आता मनसे ही या वादात उतरली आहे. कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, ‘कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.’
काय ट्विट केलतं कंगनाने
“बरेच जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी आता येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला थांबवा” असा एल्गार कंगनाने केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
![](https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/wp-content/uploads/2020/09/WhatsApp-Image-2020-09-04-at-5.03.14-PM.jpeg)
![](https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/wp-content/uploads/2020/09/WhatsApp-Image-2020-09-04-at-5.03.14-PM.jpeg)