मानवाच्या शाश्वत प्रगती व्हावी म्हणून साजरा होतो “भूगोल दिवस”

“भूगोल साक्षरता आठवडा” हा १९८७ पासून नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर भारतात १९९६ पासून १४ जानेवारी (मकर संक्रमण दिन) हा ‘भूगोल दिवस’ साजरा केला जातो.

१९८७ पासून अमेरिकेमध्ये राष्ट्रीय भूगोल संघटना भौगोलिक साक्षरता वाढवण्यासाठी शाळा, संस्था, विविध संघटना यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. विद्यार्थी व समाजात भौगोलिक साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

‘भारतीय खगोलशास्त्र’ हे अति प्रगल्भ असे शास्त्र आहे. प्राचीन काळापासून भारतीयांचा यावर विशेष अभ्यास व पगडा आहे. खगोलशास्त्र ही भूगोलाची एक शाखा म्हणता येईल.
भूगोलावर आधारित ग्रह, तारे, नक्षत्र, राशी व पंचांगचा सखोल व सविस्तर अभ्यास आपल्या पूर्वजांनी केलेला आहे. आजच्या विज्ञानाच्या २१ व्या शतकातही आपण पूर्वी तयार केलेल्या पंचांग व खगोलीय गणितांचाच वापर करतो. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लिहिलेला ‘आरायन’ हा ग्रंथ आजही खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत आहे.

मानवी गोलामध्ये पर्यावरणाचा प्रभाव व उपयोग, मानवनिर्मित संसाधने, संपत्ती व पर्यावरणाचा मानवावरील समग्र परिणाम याचा अभ्यास केला जातो. तर प्राकृतिक भूगोलामध्ये सजीव, वातावरण, जमीन, पाणी, भूरचना व त्यांचा परस्परसंबंध यांचा सातत्याने अभ्यास केला जातो.

भूगोल दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच जागरुक होऊन नव्या जगातील नव्या समस्यांचा विचार करून पर्यावरणीय दृष्टिकोनातून व मानवाच्या शाश्‍वत प्रगतीसाठी प्रयत्न करूयात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा