जय श्रीराम असं लिहिलेली २००० पत्र आज पोस्टाने सिल्वर ओक मुंबई येथे पाठवण्यात आली!

लोणी काळभोर,२७ जुलै २०२०: भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी,पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुका भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज २००० जय श्रीराम असं लिहिलेली पत्र आज सिल्वर ओक मुंबई येथे पाठवण्यात आली.

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार साहेब यांनी राम मंदिराची गरज काय,असे वक्तव्य केले होते. यांच्या वक्तव्यामुळे भारतातील शंभर कोटी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

हज हाऊससाठी आग्रही असणारे पवार साहेब राम मंदिराच्या मुद्द्याला मात्र सोयीस्करपणे बगल देत आहेत. प्रभू श्रीराम आमची श्रद्धा आहे. रामायण हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. गेली कित्येक वर्षे रामाला स्वतःचे घर मिळाले नाही, हे फक्त भारतीय जनता पार्टी मुळे शक्य झाले आहे. असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितले आहे. आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे हिंदुत्ववादी मतांचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे.

आदरणीय शरद पवार साहेबांनी हे वक्तव्य केले असून त्यांना प्रभु श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, हवेली तालुका विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांना जय श्रीराम लिहिलेली ११००० पत्र पाठवण्यात आली.

याची सुरुवात आज लोणीकाळभोर येथून करण्यात आली आहे. या प्रसंगी भाजपचे नेते प्रवीण काळभोर, युवा नेते कमलेश काळभोर, भाजपा नेते चित्तरंजन गायकवाड, व विद्यार्थी संघटनेचे शुभम उर्फ नन्या तुपे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा