नवी दिल्ली, 7 ऑक्टोंबर 2021: देशातील 70 टक्के वीजनिर्मिती केंद्रे कोळशावर आधारित आहेत. एकूण 135 औष्णिक वीज केंद्रांपैकी 72 मध्ये 3 दिवसांपेक्षा कमी कोळसा साठा आहे. तर 50 वीज प्रकल्प आहेत जिथे 4 ते 10 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. फक्त 13 कारखाने आहेत जिथे 10 दिवसांपेक्षा जास्त काळ कोळसा शिल्लक आहे.
उर्जा मंत्रालयाच्या मते, कोळशाचे उत्पादन आणि आयात करताना येणाऱ्या समस्या हे त्यामागील मुख्य कारण आहे. पावसाळ्यामुळे कोळशाचे उत्पादन कमी झाले आहे. त्याच्या किंमती वाढल्या आहेत आणि वाहतुकीमध्ये खूप अडथळे आले आहेत. या अशा समस्या आहेत ज्यामुळे आगामी काळात देशात वीज संकट येऊ शकते.
कोळशाच्या संकटामागे कोरोनाचा काळ हे एक मोठे कारण
उर्जा मंत्रालयाने सांगितले आहे की वीज संकटामागील एक कारण कोरोनाचा काळ देखील आहे. वास्तविक, या काळात विजेचा भरपूर वापर झाला आहे आणि आता पूर्वीच्या तुलनेत विजेची मागणी खूप वाढली आहे. उर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात विजेचा एकूण वापर 10 हजार 660 कोटी युनिट होता. हा आकडा 2021 मध्ये दरमहा 12 हजार 420 कोटी युनिटपर्यंत वाढला आहे.
विजेची ही गरज पूर्ण करण्यासाठी कोळशाचा वापर वाढला. 2021 च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात 2019 च्या तुलनेत कोळशाचा वापर 18 टक्क्यांनी वाढला आहे. भारतात 300 अब्ज टन कोळशाचे साठे आहेत. पण तरीही इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका सारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात कोळसा आयात होतो. जर आपण इंडोनेशियाबद्दलच बोललो तर मार्च 2021 मध्ये कोळशाची किंमत $ 60 प्रति टन होती, जी आता $ 200 प्रति टन झाली आहे. यामुळे कोळशाची आयात कमी झाली आहे. थर्मल पॉवर प्लांट्सची विजेची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक कारणांमुळे कोळसा पोहोचत नाही. यामुळे कारखान्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपत गेले. आता संकट असे आहे की 4 दिवसांनी देशातील अनेक भागात अंधार पडू शकतो.
कोळशाच्या संकटावर ओवेसींनी पंतप्रधानांना लक्ष्य केले
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी कोळशाच्या संकटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली कोळसा उर्जा केंद्रांकडे सरासरी चार दिवसांचा कोळसा साठा शिल्लक आहे, असा ओवेसींनी टोला लगावला. गेल्या अनेक वर्षांतील हा सर्वात कमी उपलब्ध स्टॉक आहे. वीज बिलाचे दर वाढू शकतात. याशिवाय, तुम्हाला वीज कपातीलाही सामोरे जावे लागू शकते. देशातील 70 टक्के वीज कोळशावर अवलंबून आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे