किरकोळ वादातून चाकूने हल्ला तर एका व्यक्‍तीचा मृत्यू

दिल्ली, २२ मे २०२३: राजधानी दिल्लीतील अशोक विहार परिसरात एका खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री ९च्या सुमारास अशोक विहार परिसरात ही हत्या करण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आशिष कुमार असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिषचा भाऊ विशाल याने सांगितले की, तो रेल्वे ट्रॅकजवळील एका पार्कमधून जात होता. दरम्यान, तिघांनी त्याचा मार्ग अडवला, त्यावरून वाद सुरू झाला. वाद सुरू असताना एकाने चाकू काढून आशिषवर हल्ला केला. चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आशिष जमिनीवर पडला.

घटनेनंतर आरोपी फरार झाला. आशिषचा भाऊ विशाल याने सांगितले की, त्याने घाईघाईने पोलिसांना माहिती दिली आणि माहिती मिळताच पोलिस घटनास्थळ पोचले. मात्र चाकूचा हल्ला गंभीर असल्याने आशिषचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. तपासादरम्यान आरोपी अमित याला अटक करण्यात आली आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा