अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात दोन गटात वाद, दोन जण जखमी

अहमदनगर ६ जून २०२३ : अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात दोन गटात वाद झाला आहे. दोन गटातील वाद झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. आता परिसरात शांतता आहे. संबंधित घटना ही संगमनेर तालुक्यापासून ५ ते ६ किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात घडली. या वादादरम्यान काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. संगमनेरमध्ये आज सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा संपल्यानंतर नागरीक घरी जात असताना ही घटना घडली.

आज संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाकडून भगवा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला गालबोट लागल्याचे मानले जात आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू समाजाचे नागरीक या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चानंतर एका गावात दोन गटात वाद उफाळल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचा आरोप आहे की, काही तरुण वाहनावरु येऊन दगडफेक सुरु केली. महिलांना मारण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांनादेखील मारहाण केली, असा आरोप केला आहे. संबंधित घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. या घटनेतील समाजकंटकाचा शोध पोलीस घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की आरोपींचे फोटो आमच्याकडे आले आहेत. त्यांच्याविरोधात लवकरात लवकर कडक कारवाई करु. आम्ही प्रसारमाध्यमांच्या माझ्यमाधून सांगू इच्छितो की, समनापूरमध्ये शांतता आहे. कुणीही अफवा पसरवू नये. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
मोर्चानंतर काही लोक जात असताना दोन-तीन गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. त्यावेळी थोडा काळ पळापळ झाली. परंतु त्यावेळी पोलीस हजर होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आता शांतता आहे. याप्रकरणी पुधील कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा