उद्धव ठाकरे राहिले केवळ 943 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, फक्त दोनच मुख्यमंत्री पूर्ण करू शकले 5 वर्षांचा कार्यकाळ

पुणे, 30 जून 2022: महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांची राजवट संपली आहे. 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे यांनी 29 जून 2022 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. अशाप्रकारे त्यांना केवळ 943 दिवस मुख्यमंत्रिपदावर बसता आलं. त्यांच्यापूर्वी असे दोनच मुख्यमंत्री झाले आहेत ज्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळली आहे.

एक भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक. 1960 मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झाल्यापासून या दोन मुख्यमंत्र्यांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. यामध्ये 1963 ते 1967 या काळात वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. 1967 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा दुसरा टर्मही पूर्ण केला. दुसरीकडं, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्रिपदावर होते.

महाराष्ट्राने अनेक दिग्गज पाहिले, पाच वर्षे टिकणं अवघड

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले असोत की शंकरराव चव्हाण यांनी तीनदा ही खुर्ची भूषवलेली अनेक दिग्गज नेतेमंडळी आता महाराष्ट्राने पाहिली आहेत. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ कोणीही पूर्ण केला नाही. काही ना काही कारणानं या सर्वांची वेळोवेळी पदं गेली. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ सरकार बनवून काम संपत नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पूर्ण कार्यकाळ पार पाडावा, हे वेगळं आव्हान आहे.

उद्धव सरकार पडण्याची पटकथा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सांगायचं तर ते ठाकरे कुटुंबातील पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी जशी सुरुवात केली होती, तसाच त्यांचा संपूर्ण कार्यकाळ संपणार असल्याचे बोललं जात होतं. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून वेळोवेळी त्यांच्या सरकारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. विचारधारेशी तडजोड केल्यामुळं शिवसेनेला हिंदुत्वाच्या क्षेत्रात टिकून राहणे आधीच अवघड जात होतं. या सगळ्यावर जेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा मैदानावरील परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. आधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी स्फोटके मिळाल्याचा वाद, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप. त्यानंतर मोठा नेता नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंगचा खटला.

आमदारांनी बंड का केलं?

या सर्व वादांनी हळूहळू महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पाया कमकुवत करण्याचे काम केलं. पण ही प्रक्रिया इतकी संथ होती की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फार काळ माहित नव्हतं की त्यांचे सरकारही धोक्यात येऊ शकते. आता या भ्रष्टाचाराच्या वादातून ते पुढं गेले तर त्यांच्याच पक्षानेही त्यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी केली आहेत. शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून येऊ लागल्या. त्या आमदारांना त्यांच्या भागात विकासकामे करण्यासाठी निधी दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेचे सर्वाधिक आमदार तिथून विजयी असताना त्या भागात राष्ट्रवादीच्या नेत्यांना पालकमंत्री करण्यात आल्यानेही वाद निर्माण झाला होता. या मुद्द्यावरून शिवसेनेतही नाराजी पसरली होती आणि नंतर अनेक आमदारांनी बंडखोरी केली होती.

तसं, बंडखोर आमदारांच्या नाराजीचे एक कारण म्हणजे राष्ट्रवादीला सरकारमध्ये मोठी मंत्रिपदे देण्यात आल्याचेही मानलं जात आहे. मग ते अर्थ मंत्रालय असो की पाटबंधारे मंत्रालय. अशा परिस्थितीत संघर्षाची परिस्थिती सातत्यानं आणि अनेक वेळा निर्माण होत राहिली. याशिवाय काही प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बंडखोरांना वाटत होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस मैदानावर अधिक सक्रिय दिसत असेल, तर त्याची कारणेही विचारात घेतली जात आहेत. सरकार स्थापनेपूर्वी अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. ते सरकार चालवता आलं नाही, पण राष्ट्रवादीला स्पष्ट संदेश मिळाला. त्यांनी आपल्या सर्व आमदारांना, कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची गरज होती. यासाठी मैदानावर संघटना मजबूत करण्यावर पूर्ण भर देण्यात आला.

आता या कारणांमुळं एकीकडं शिवसेनेच्या आत द्वेषाची भिंत निर्माण झाली आहे आणि दुसरीकडे ठाकरे कुटुंबाविषयी उदासीनतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कारणामुळं हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत निघून गेल्यावर उद्धव ठाकरेंच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कोणाचेच मन दुखलं नाही आणि सर्वांनी एकाच आवाजात सध्याचे सरकार पाडण्याचा आग्रह धरला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा