नाशिकमध्ये लक्झरी बस आणि टँकरचा अपघात, अपघातानंतर बसणे घेतला पेट, १२ प्रवासी जळून खाक

नाशिक, ८ ऑक्टोबर २०२२ : नाशिक मध्ये औरंगाबाद रोडवर हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुल्यावर लक्झरी बस आणि टँकरचा आज पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाता झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. यावेळी आगीत बसमधील जवळपास १३ प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. चिंतामणी ट्रॅव्हल्स ची बस यवतमाळ येथून मुंबईकडं जात असताना हा अपघात झाला.

साधारणपणे अर्धा तासाहून अधिक वेळ बस पेटलेली होती.
घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर पेटलेली बस विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यावर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरण्याची संधी मिळाली त्यांनी उड्या मारल्या मात्र आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीत जळून खाक झाले. या हृदयद्रावक घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या अपघातानंतर लक्झरी बस ५० ते ६० फूट घसरत पुढे गेली तर टँकर ७० ते ८० मीटर पुढे जाऊन थांबला. अपघाता नंतर बसने पेट घेतल्याने जळून मृत झालेल्या लोकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसने हलविण्यात आले. सादर घटनेत १२ लोक जळून खाक झाले तर ३४ जणांवर उपचार सुरू आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा