बहुरूपी हेर बहिर्जी नाईक

         महाराजांचा असाच एक विस्वासू बहुरुपिया चोख बातमीदार म्हणजे बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक हा शिवाजी 
महाराजांचा अत्यंत विस्वासू नजरबाज होता. आणि बहुरूपी हि होता. महाराजांनी त्याला हेरखात्याचा प्रमुखपदीनेमले होते. बहिर्जी शत्रूंमध्ये शिरून महत्वाची बातमी घेऊन येत असे. बहिर्जी हा महाराजांचा अत्यंत विश्वासू 
नजरबाज होता. तरबेज बहुरूपी होता. महाराजांनी ह्याला हेरखात्याच्या प्रमुखपदी नेमले होते. बहिर्जी शत्रूगोटात जाऊन महत्वाची बातमी घेऊन येत असे. सुरत हि औरंगजेबाची सोन्याची लंका होती. या लंकेची खडानखडा माहिती बहिर्जीने महाराजांस कळवली. त्याने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारानेच महाराजांनी सुरतेवर 
आक्रमण केले. आणि स्वराज्यास अमाप संपत्ती मिळाली.सुरत हि औरंगजेबाची सोन्याची लंका होती. या लंकेची सर्व अचूक माहिती बहिर्जीने महाराजाना कळवली. सुरत शहरावर हल्ला करायचा,तिथली बाजारपेठ 
लुटायची. शत्रूच्या कैदेतुन आपल्या श्रमलक्ष्मीला आणायचे त्यासाठी तेथील शहराची आणि सुरक्षिततेची 
माहिती काढणे महत्वाचे होते. शत्रूच्या गोटात जाऊन त्याच्याच विरुद्ध माहिती गोळा करायची हे काम काही 
सोपे नव्हते. आणि म्हणूनच या जोखमीच्या कामगिरीवर महाराजांनी बहिर्जी नाईक याला पाठवले. 

        बहिर्जी नाईक  यांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारानेच महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले होते. स्वराज्यास अमाप  संपत्ती मिळाली. बहिर्जी नाईक तेज दिमाखाचा, नाटकी, आणि शिवाजी महाराजांचा सच्चा इमानी सेवक, बहिर्जींचे घराणे जाधवांचे, त्याच्या अशाच खास गुणांमुळेच महाराजांनी त्याची निवड केली होती. पंतांचा सल्लामानून महाराजांनी लगेच बहिर्जी नायकाकडे एक सांगावा पाठवला. तो निरोप मिळताच मोठया आनंदाने
घोड्यावर टांग मारली. वाऱ्याच्या वेगाने येऊन तो शिवरायांपुढे उभा राहिला. महाराजांना मानाचा मुजरा करीत म्हणाला,राजे आज या सेवकाची खास याद काढली. काही विशेष कामगिरी,”होय बहिर्जी कामगिरी खरंच विशेष आहे,आम्हाला त्या कामी तुमची गरज आहे. आमचा मनसुबा आहे कि,राज्याचा रिता होणारा खजिना भरण्यासाठी सुरतेची लूट करायची. महाराज तुम्ही निश्चित राहा हि हेरगिरीची कामगिरी फत्ते झालीच म्हणून
समजा. फक्त थोडी मोहोलत असावी. बहिर्जी म्हणाला. कामगिरी कळली. महत्व समजले. पंत आणि 
महाराजांना वंदन करून,त्यांचे आशीर्वाद घेऊन बहिर्जी नाईकाने आपल्या दोन साथीदारांसह सुरतेकडे तातडीने प्रयाण केले.राजगडापासून ते तापी तीरावरील त्या सोन्याच्या लंकेचा सुरतचे अंतर दीडशे कोसाचे. 

       शहराभोवती भली मोठी वेस. त्या गावात प्रवेश करायचा तर बऱ्हाणपूरच्या भव्य पोलादी दरवाजातून करावा 
लागे. प्रवेशद्वारावर पहारेकऱ्यांचा सक्त खडा पहारा. गावाजवळ इंग्रज आणि आणि त्यांच्या वखारी सुरतेची 
बाजारपेठ म्हणजे  सोने, चांदी, जड जवाहीर, उंची रेशमी कपडे, दागदागिने, ऐषोआरामाच्या आणि चैनीच्या 
वस्तू. शहराच्या मध्यवर्ती भागात एक भुईकोट किल्ला. किल्ल्याच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी किल्लेदार  इनायतखान याची. किल्ल्याबरोबर त्या श्रीमंतांच्या निवासस्थानाची,भव्य दिव्य बाजारपेठेची,सगळ्या वैभवाची रक्षणाची जबाबदारी इनायत खान याची. त्याच्या इशाऱ्यावर शत्रुवरती तुटून तुटून पडण्यास सज्ज पाच  हजार सैन्य. अशा या सुरतेत बहिर्जी नाईक आणि त्याचे दोन साथीदार ह्यांनी मोठ्या चतुराईने शहरी वेषांतर करून प्रवेश मिळवला. आपल्या शोधक नजरेनं बहिर्जी आपल्या साथीदाराच्या मदतीने टेहाळणी करत  असताना चौकीवरील पहारेकऱ्याच्या ते नजरेस आले.त्याने तिघांनाही हटकले त्यांची चौकशी केली. मात्र बहिर्जीने गोड मिठास भाषा वापरली आम्ही शाहीर मंडळी कामधंद्याच्या इराद्याने नगरीत आश्रयाला आलोआहोत. अशी खात्री पटून दिली. पहारेकऱ्यांनी त्या तिघांना किल्लेदारासमोर पेश केले. सुरतसारख्या शहरात  मराठी माणसांना पाहून इनायातखानला आश्चर्य वाटले. पण बहिर्जींचे भाषाचातुर्य आणि इनायातखानाच्या        नगराची तोंडभरून केलेली स्तुती ऐकून इनायतखान खुश झाला. 

        बेहद खुश झालेल्या इनायतखानाने बहिर्जी नाईक आणि त्याचे साथीदार यांची खास मेहमान म्हणून विशेष व्यवस्था केली. इनायतखानाचा पाहुणचार घेतअसताना बहिर्जीला एक संधीच मिळाली. त्याने किल्ल्याची सुरक्षा,चोरवाटा,आतला दारुगोळा,फौज याची बातमी गोळा केली. आणि एक दिवस बाजारपेठ फिरून येतो अस म्हणूनबहिर्जी आला तो राजगडावरच. महाराजांची भेट घेऊन बहिर्जीने महाराजांना खूप माहिती पुरवली. राजांनी बहिर्जीच्या चातुर्याच कौतुक केलं. माय भवानीचा आशीर्वाद घेऊन महाराज, नेताजी पालकर,बहिर्जी नाईक आणि भली मोठी फौज घेऊन सुरतेच्या मोहिमेवर निघाले. बहिर्जींनी बरोबर मार्ग दाखवला आणि शिवरायांची फौज सुरतजवळच्या उधना या गावी येऊन धडकली. नेमकी हि बातमी इनायत खानाच्या हेरांना लागली. त्यांनी खानालासावध करण्याचा प्रयत्न केला. पण खानाने त्या वार्तेची गंभीर दखल घेतली नाही. शिवाजी सुरतेवर हल्ला करायला आला आहे,या वार्तेनेसुरतमधली मालदार मंडळी हवालदिल झाली. काहींनी तर गावच सोडले डच, इंग्रज ह्यांनी आपापल्या वखारी वाचवण्यासाठी संरक्षणफळी उभी केली. सारं सुरत शिवाजी येतोय ता वार्तेने भयभीत झाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा