भारताच्या चांद्रयान-३ ने रचला इतिहास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग

बंगळुरू, २३ ऑगस्ट २०२३ : भारताच्या चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. याना ने चंद्राच्या अंतिम कक्षेपासून २५ किमीचा प्रवास ३० मिनिटांत पूर्ण केला. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. ५ वाजून ३० मिनिटांनी सुरुवातीला रफ लँडिंग खूप चांगली झाली. यानंतर लँडरने ५ वाजून ४० मिनीटांनी लॅण्डरने व्हर्टिकल लँडिंग केले. तेव्हा त्याचे चंद्रापासूनचे अंतर ३ किमी होते.

लँडरने सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवले असुन भारत चंद्राच्या या भागात वाहन उतरवणारा हा चौथा देश ठरला आहे. हा विक्रम रशियाच्या नावावर झाला असता, भारतापूर्वी रशिया चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Luna-25 यान उतरवणार होता. हे लँडिंग २१ ऑगस्ट रोजी होणार होते, परंतु शेवटची कक्षा बदलताना ते मार्गापासून दूर गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले- हा क्षण भारताच्या ताकदीचा आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. अमृत काळात अमृताचा वर्षाव झाला. आपण पृथ्वीवर एक प्रतिज्ञा घेतली आणि ती चंद्रावर साकार केली. अंतराळात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे आपण साक्षीदार आहोत.

चांद्रयान-3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी त्याला ४१ दिवस लागले. पृथ्वीपासून चंद्राचे एकूण अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे. आता सर्वजण विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. धूळ स्थिरावल्यानंतर ते बाहेर येईल. विक्रम आणि प्रज्ञान एकमेकांचे फोटो काढून पृथ्वीवर पाठवतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा